वाल्मिकी रामायणातील वर्णनाचे विशेषतः किष्किंधा कांडातील ४० ते ४३ सर्गातील श्लोकांचे विज्ञाननिष्ठ परीक्षण म्हणजे हे पुस्तक. नीलेश ओक आणि दीपाली पाटवदकर या लेखकांनी या प्राचीन संस्कृत श्लोकांचे काळजीपूर्वक विश्लेषण करून त्यांची आधुनिक भूगोलाशी सांगड घातली आहे. तसेच भूविज्ञान, हवामानशास्त्र, नकाशाशास्त्र आणि मानववंशशास्त्रातील समकालीन संशोधनाने ते सिद्ध केले आहेत. या सर्व प्रक्रियेचे निष्कर्ष आश्चर्यकारकही आहेत आणि ज्ञानवर्धकही!
या पुस्तकातून जे रामायण उलगडते, त्याचा पट प्रादेशिक नसून जागतिक आहे. ते केवळ गंगा-यमुनेच्या खोऱ्यापुरते किंवा भारतीय उपखंडापुरते मर्यादित राहत नाही, तर दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगा, युरोपातील आल्प्स, उत्तरेकडील आर्क्टिक महासागर आणि दक्षिणेकडील गोठलेल्या अंटार्क्टिकाच्या विस्तीर्ण प्रदेशांपर्यंत विस्तारलेले आहे. हे वर्णन केवळ काव्यात्मक कल्पना नसून प्रत्यक्ष अनुभवाचे द्योतक आहे.
सुग्रीवाज् अॅटलस हे पुस्तक पद्धतशीर संशोधनाचे फलित आहे. हे संशोधकांना केवळ माहिती देत नाही, तर 'माहितीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन' देते.